Skip to main content

Posts

Showing posts from March, 2009

महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला?

रणजीत देसाई यांच्या ‘ श्रीमान योगी ’ या पुस्तकाची नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेली प्रस्तावना ही शिवचरित ्राचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. याच प्रस्तावनेत कुरुंदकरांनी महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला ते सांगितले आहे. तो भाग या प्रस्तावनेतून जसाच्या तसा... ................................... इ. स. १६७४ ला शिवाजीने स्वतःला राज्याभिषेक करण्यासाठी हजार प्रयत्न करून, आपले क्षत्रियत्व त्याने सिद्ध केले. मुंज केली. प्रायश्चित्तं घेतली. स्वतःच्या पत्निंशीच नव्याने लग्ने केली. अभिषेकाचा इतका खटाटोप शिवाजीने का केला असा एक प्रश्न आहे. बेंद्रे यांचे म्हणणे असे की, ब्राह्मण गुन्हेगारांना शासन करणे, धार्मिक प्रश्नावर निकाल देणे हा अधिकार यावा म्हणून शिवाजीने राज्याभिषेक करून घेतला. माझे म्हणणे असे की, तो काळ धार्मिक प्रभाव आणइ वर्चस्वाचा काळ आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राज्याभिषेकाला पावित्र्य आणि प्रतिष्ठा आहे. राज म्हणजे मुसलमान, ही त्यावेळची समजूत आहे. दिल्लीपती हा सर्व भारताचा स्वयंभू सम्राट मानला जाई. यामुळे बहामनी घराणे वैभवात असतानाही जनतेला व खुद्द बहामनी वजीरांना आपल्या राज

महाराजांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार होते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले. महराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी... सिद्दी हिलाल घोडदळातील सेनापती सहाय्यक पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले. उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले. सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलालचा पुत्र) घोडदळातील सरदार सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत जखमी (२ मार्च १६६०) आणि कैद. सिद्दी इब्राहिम शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली. सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले. नूरखान बेग स्वराज्याचा पहिला सरनोबत २१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला. दिड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली. मदारी मेहतर विश्वासू सेवक आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायां

महाराष्ट्रात तीन शिवजयंती उत्सव का होतात?

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन वेगवेगळ्या दिवशी साज-या केल्या जातात. त्या का यांची माहिती... १.बखरकारांनी निर्देशित केलेली वैशाख शुद्ध पंचमी शके १५४९ ही शिवजन्मतिथी इतर पुरावे मिळेपर्यंत संशोधकांनी प्रमाण मानली होती. काही पुराणमतवादी नवीन जन्मतिथी पुराव्यांशी सहमत नाहीत. म्हणून ते लोक त्या तिथीला शिवजयंती उत्सव करतात. २.जेधे शकावलीनुसार फाल्गुन वद्य तृतिय शके १५५१ ही शिवजन्मतिथी बहुतांशी जुन्या नव्या संशोधकांना मान्य आहे. शिवकाळात इंग्रजी कालगणना हिंदुस्तानात प्रतलीत नव्हती. शिवराय हिंदूधर्माभिमानी होते. प्रभु रामचंद्र भगवान श्रीकृष्ण या सारख्या दैवतांत शिवरायांचे स्थान मानुन हिंदुधर्माभिमानी बहुतांशी या तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करतात. ३. सध्या हिंदुस्थानच्या सर्व सरकारी, नीम सरकारी, नागरी, आर्थिक, शैक्षणिक कारभार इंग्रजी कालगणनेनुसार चालतो. या देशांतील दिनदर्शिका इंग्रजी कालगणनेनुसार तयार केल्या जातात. ३७५ वर्षापूर्वी फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ ही हिंदु कालगणनेची शिवजन्म तिथी, इंग्रजी कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी आली होती. ती सरकारमान्

External links

* Maratha & Marathi Language Information in Marathi Language * http://www.gutenberg.org/files/20583/20583-8.txt * The Maratha community * The Maharajas of Thanjavur * Maratha history * "The Marathas" at Columbia Encyclopaedia * J.T.Platt's Dictionary of Urdu, Hindi * RoyalArk- (former British) India (here the Glossary page, see also individual dynasties)

References

1. Haplogroups of the Marathi people 2. Molecular insight into the genesis of ranked caste populations of western India by Sonali Gaikwad and VK Kashyap 3. Influence of language and ancestry on genetic structure of contiguous populations by Sanghamitra Sahoo and VK Kashyap 4. Polarity and Temporality of High-Resolution Y-Chromosome Distributions in India Identify Both Indigenous and Exogenous Expansions and Reveal Minor Genetic Influence of Central Asian Pastoralists by Sengupta et al.

Marathi paul padte pudhe...

Corporate World * S Chowgule, of the Chowgule industries & Steamships. * Suhas Patil, a founder of Cirrus Logic’s predecessor company Ramakant gaikavad (Swadeshi Netwok marketing) Political * Shrimati Pratibha Patil, First Women President of India * Yashwantrao Chavan (Former Deputy Prime Minister of India) * Balasaheb Thakrey(Hindu Hriday Samrat) * Uddhav Thakrey(President of Shivsena) * Raj Thakrey(Marathi Hriday Samrat) * Sharad Pawar, Agriculture Minister of India. * Balasaheb Vikhe Patil, M.P. & Chairman, Standing Committe of Defence, Government of India * Vasant Dada Patil, former Chief Minister of Maharashtra * Ramrao Adik, former Deputy Chief Minister of Maharashtra * Dr D.Y.Patil, Founder Chancellor of D.Y.Patil University * Shankarrao Chavan, former Home Minister of India * Madhavrao Scindia * Vilasrao Deshmukh, former Chief Minister of Maharashtra * Govindrao Adik, former Member of Parliament * R. R.

Maratha Mawala's

Maratha Army from King Shivaji's period onwards having good mixture of All castes in Maharashtra but among them major population of Sardar's,Subhedars and other Martial posts was generally held by these Royal true 96k clans of Maratha.

Historical

* Shahaji Raje, father of Chhatrapati Shivaji Maharaj. * Jijabai, mother of Chhatrapati Shivaji Maharaj. * Chhatrapati Shri Shivaji Maharaj * Sambhaji Raje, son of Chhatrapati Shivaji Maharaj. * [Yesubai], wife of Sambhaji Raje and mother of Shahu. * Rajaram Raje Bhosale,Maratha Leader after King Sambhaji. * Sarsenapati(General) - Hambirrao Mohite from Talbid near Karad * Tarabai, Regent of Kolhapur, daughter of Sarsenapati Hambirrao Mohite also the wife of Rajaram * Umabai Dabhade - Won the Ahmedabad war against Mughals in 1732 (wife of Sarsenapati Khanderao Dabhade) * Serfoji II, Maharaja of Tanjavar * Shahu Maharaj, Chhatrapati of Kolhapur * Prataprao Gujar,first Sarsenapati of Shivaji's army. * [Shivaji II], son of Tarabai and Rajaram, who was made the king during his minor age by his mother Tarabai. * Tanaji Malusare, hero of the conquest of Kondhana. * Kanhoji Angre,Navy Suprmo of Maratha and Supreme warrior,who was on t

Bilingual Marathas

The empire also resulted in the voluntary relocation of substantial numbers of Maratha and other Marathi-speaking people outside Maharashtra, and across a big part of India. Thus, there are today several small but significant communities descended from these emigrants living in the north, south and west of India. These communities tend often to speak the languages of those areas, although many do also speak Marathi in addition. Gujarati, Hindi, Konkani, Kannada, Telugu and Tamil are some of the other languages thus spoken Zinjurke's of Shirur...

Maratha states

Since the Marathas ruled much of India in the period immediately preceding the consolidation of British rule in India, the Maratha states came to form the largest bloc of princely states in the British Raj, if size be reckoned by territory and population. Prominent Maratha states included: Ruins of the Raigad Fort which served as a capital of Maratha Empire in the 17th century * Kolhapur * Solapur * Gwalior * Indore * Baroda * Dewas (Senior and Junior) * Dhar * Chhatarpur * Mudhol * Sandur (princely state) in Bellary District of Karnataka India * Akkalkot * Phaltan * Jath * Jawhar * Sawantwadi * Satara * Marathwada * Thanjavur, and many others * Nashik, * Jalgaon, * Vidarbha.

Historical prominence

The extent of the Maratha Confederacy c.1760 AD, roughly corresponding to its peak (denoted by the yellow region) Main article: Maratha Empire Different Maratha (also called as Rastriks or Maha-rathis or Mahrattas) rulers during Medieval period (before 12th century) include Satavahana, Rashtrakuta, Yadhav-Jadhavs. They re-united into historical prominence under the leadership of Chhatrapati Shivaji in the 17th century. Shivaji Maharaj, born into the Bhosale clan of Marathas, secured an independent state by dint of lifelong struggle and thereby founded an empire, the remnants of which lasted until the independence of India in 1947. The state thus founded by Chhatrapati Shivaji attained its zenith under the tutelage of the Peshwas in the 18th century, extending from the Indus in present-day Pakistan to Orissa in the east and from the Punjab to central Karnataka in the south. The kingdom of Thanjavur in present-day Tamil Nadu was also ruled by a Maratha dynasty, albeit outside the ambit o

Population

The Marathas originated as a social class of Marathi speakers (Indo-Aryans). They number some 40 million[citation needed], about half the number of native Marathi speakers. Maratha people are the original people of Maharashtra pradesh. They belong to the Kshatriya (King /Warrior) class.

Maratha clans

Main article: Maratha clan system According to some sources (mostly elitist), most Marathas must belong to one of the 96 different clans (The "96 Kuli Marathas", but it's been forever debatable as there is no constructive evidence or social hierarchical structure that determines who is 96 Kuli & who is not). The list of 96 Maratha clans is different as per different historians. An authoritative listing was apparently first attempted in 1889 and a list finalised in 1956 by the Government of India.

Etymology

The etymology of the words "Marātha" and "Marāthi" is uncertain. It may be a derivative of the Prakrit word Marhatta found in Jain Maharashtri literature, itself from Sanskrit Maharāṣhṭra "great realm" (from maha "great" and rāṣṭra "nation, dominion, district"). One theory holds that a reference to a clan known as Rāṣṭrika in some of Ashoka's inscriptions alludes to a people of the Deccan who were progenitors of the Marathi-speaking people; that the later "Mahārāṣhṭri Prakrit" is associated with these people Other theories link the words Marātha and Rāṣhṭri with Ratta, supposedly a corruption of Rāshtrakuta, the name of a dynasty that held sway over the Deccan from the 8th to 10th centuries. All theories however affirm, as do linguists, that the modern Marathi language has developed from the Prakrit known as Mahārāshtri.

The Marāthās

The Marāthās (Marathi: मराठा, also Mahrattas) are Indo Aryan speaking castes of Hindu warriors and peasants hailing mostly from the present-day state of Maharashtra, who created the expansive Maratha Empire, covering a major part of India, in the late 17th and 18th centuries. They are Kshatriyan warriors. The "Maranthas" were known by that name since their native tongue was almost invariably Marathi, however, not all those whose native tongue is Marathi are Marathas. Historically "Maratha" was a common term used for people of Maharashtra region that speak Marathi.[1] In present time, the term "Maratha" refers only to those Marathi-speaking people who also belong to certain specific Hindu castes: for one available listing, refer to Maratha clan system. Thus, the terms "Marathi people" and "Maratha people" are not interchangeable and should not be confused for each other.

Further reading

* Shivchatrapati- Ek Magowa by Dr Jysingrao Bhausaheb Pawar. * Apte, B.K. (editor), Chhatrapati Shivaji: Coronation Tercentenary Commemoration Volume, Bombay: University of Bombay (1974-75) * Duff, Grant, History of Marhattas, Oxford University Press, London Link - http://books.google.com/books?id=FKQ9AAAAMAAJ&printsec=frontcover&dq=subject:%22Maratha+(Indic+people)%22#PRA1-PR21,M1. * V.D.Katamble, Shivaji the Great, Pune : Balwant Printers - English Translation of popular Marathi book "Shrimanyogi". * Kasar, D.B., Rigveda to Raigarh - Making of Shivaji the Great, Mumbai: Manudevi Prakashan (2005) * Vishwas Patil - Sambhaji, Mehta Publishing House, Pune (2006) ISBN 81-7766-651-7 * Purandare B. M. (author), Raja Shivachhatrapati, he is the most popular and most enigmatic historian of Maratha times, especially that of Shivaji. He is revered throughout Maharashtra as "Shivashahir". * Sriman Yogi * Joshi, Ajit, Agryahun Sutka, Mar

References

References 1. ^ Chhatrapati Shivaji. p. 18. ISBN 8128808265. http://books.google.com/books?id=HsBPTc3hcekC. 2. ^ Shivaji the Great. p. 193. ISBN 8190200003. http://books.google.com/books?id=N5mIVt_Zd-0C. 3. ^ The Presidential Armies of India. W.H. Allen. p. 47. http://books.google.com/books?id=YX9JAAAAMAAJ. 4. ^ a b "Itihaas - Shivaji assumes the title of Chattrapati". Sify Corporation. http://sify.com/itihaas/fullstory.php?id=13374092. Retrieved on 2006-11-20. 5. ^ Shivaji and Indian Nationalism. Central Pub. House. p. 130. http://books.google.com/books?id=lAAeAAAAMAAJ&pgis=1. 6. ^ Setumadhavarao S. Pagadi. (1993). SHIVAJI. NATIONAL BOOK TRUST. p. 21. ISBN 8123706472. http://books.google.com/books?id=UVFuAAAAMAAJ&pgis=1. 7. ^ Shivaji and His Times. Longmans, Green and co. p. 20. http://books.google.com/books?id=7xNFAAAAIAAJ. 8. ^ a b c "Gazetter of the Bombay Presidency - Poona - MUSALMANS 1294-1760 - Nizamshahi". http://www.maharash

Associates

Some of Shivaji's close associates were also his primary army chieftains, and have entered folklore along with him. These include: * Antaji Konde-Deshmukh * Baji Jedhe * Baji Pasalkar * Baji Prabhu Deshpande * Balaji Avji Chitnis * Bapuji Mudgal Deshpande * Chimanaji Deshpande * Dhanajirao Jadhavrao * Firangoji Narsala * Fullaji Prabhu Deshpande * Gangadhar Pant * Gomaji Naik * Haider Ali Kohari * Hambirrao Mohite * Hiroji Farjad * Jiva Mahala * Kanhoji Jedhe Deshmukh * Keso Narayan Deshpande * Kondaji Farjand * Lay Patil Koli * Murarbaji Deshpande * Nanaji Deshpande * Neelkanthrao Surnaik * Netaji Palkar * Prataprao Gujar * Rango Narayan OrpeSarpotdar * Sambhaji Kavji * Santaji Ghorpade * Suryaji Kakade * Tanaji Malusare * Yesaji Kank Under Shivaji, many men of talent and enterprise rose into prominence. They carried forward his mission and ensured the defeat

150.अखेरचे दंडवत !

सूर्यालाही तेजोवलय असते. महाराज शिवाजीराजे यांच्याही जीवनाला एक विलक्षण तेजोवलय होते. ते होते जिजाऊसाहेबांचे. कर्तृत्वाच्या प्रचंड दुदुभीनिनादाच्या मागे सनईचौघडा वाजत असावा तशीच शिवाजीमहाराजांच्या जीवनाच्या मागे जिजाऊसाहेबांची सनई निनादत होती. जिजाऊसाहेब हे एक विलक्षण प्रेरक असे सार्मथ्य होते. महाराजांना जन्मापासून सर्वात जास्त मायेचा आशीर्वाद लाभला तो आईचाच. त्यांना उदात्त, उत्कट आणि गगनालाही ठेंगणी ठरविणारी महत्वाकांक्षी स्वप्ने वयाच्या अगदी लहानपणापासूनच पडू लागली. ती आईच्या सहवासातच. महाराज लहानपणापासूनच खूप-खूप मोठे झाले. त्यांचे प्रेरणास्थान पाठीवरून फिरणाऱ्या आईच्या मायेच्या हातातच होते. अगदी अलिप्त मनाने या आईच्या आणि मुलाच्या जीवनाचा अभ्यास केला तर जिजाऊसाहेबांची कधी दृश्य तर कधी अदृश्य, म्हणजेच कधी व्यक्त झालेली तर कधी अव्यक्त राहिलेली प्रेरक शक्ती अभ्यासकांच्या प्रत्ययास येते. प्रतिपच्चंद लेखेव ही महाराजांची विश्ववंद्य मुदा केव्हा निर्माण झाली? आज तरी या मुदेचे अस्सल पत्र इ. स. १६३९ चे सापडले आहे. पण जिजाऊसाहेबांच्या बरोबर बोट धरून शिवाजीराजे पुण्यास वडिलांच्या जहागीरीचा अधि

149.अखेरचे प्रस्थान!

शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर बहुधा दुसऱ्याच दिवशी जिजाऊसाहेबांना रायगडावरून खाली पाचाड गावातील वाड्यात आणण्यात आले. त्यांची प्रकृती बरी नव्हतीच. त्यांनी पाचाडला अंथरुण धरले. हे त्यांचे अंथरुण शेवटचेच होते. वार्धक्याने त्या पूर्ण थकल्या होत्या. त्यांचे वय यावेळी ७४ किंवा ७५ असावे. त्या आता कृतार्थ मनाने मृत्यूला सामोऱ्या जात होत्या. शिवाजीमहाराजांपेक्षा जिजाऊसाहेबांचे जीवन खडतर गेले होते. त्यांनी आयुष्यभर चिंतेतच दिवस काढले. ती त्यांची चिंता होती. स्वराज्याची , रयतेची आणि शिवाजीराजांची. प्राणावर बेतणारी संकटे महाराजांवर येत होती. मृत्यूच्या ओठावरच महाराज स्वराज्यासाठी लपंडाव खेळत होते. मृत्यूने जीभ फिरवली असती तर हा आट्यापाट्यांचा डाव मृत्यूने त्यांच्या सवंगड्यांसह गिळून टाकला असता. पण प्रत्येकवेळी महाराजांचा जणू पुनर्जन्मच होत गेला. पण त्या पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूतीवेदना जिजाऊसाहेबांना सहन कराव्या लागल्या. त्या त्यांनी सहन केल्या , न कण्हता , न विव्हळता. जिजाऊसाहेब सतत चिंतेच्या चितेत उभ्या जळतच राहिल्या. आता शेवटचे जळणे त्या मानाने अगदीच शांत आणि शीतल ठरणार होते. या त

148.रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा

राज्याभिषेकाच्या दरबारात इंग्रज वकील हजर होता. त्याने महाराजांस नम्रतेने नजराणा अर्पण केला. त्याने एक सुंदर खुर्ची गडावर आणली होती. ती त्याने दुसऱ्या दिवशी (दि. ७ जून) राजवाड्यात नेऊन महाराजांस नजर केली. सारा सोहळा अत्यंत आनंदात आणि वैभवात साजरा झाला. आलेल्या प्रत्येक पाहुण्यास कोणत्या ना कोणत्या स्वरूपात महाराजांनी प्रतिआहेर म्हणून काही ना काही देण्याची योजना केली होती. कडेवरील लहान मुलांच्या हातातही काही ना काही (बहुदा पैसे) देण्यात आले. देवराई होन , प्रतापराई होन आणि शिवराई होन ही नाणी सोन्यात पाडण्यात आली होती. सर्वच नाण्यावर एका बाजूस ' श्रीराजा शिव ' आणि दुसऱ्या बाजूस ' छत्रपती ' अशी अक्षरे होती. शिवराई नाणे तांब्याचे होते. याशिवाय फलम आणि चक्र या नावाची दोन नाणी होती. या दोन नाण्यांचे कागदोपत्री उल्लेख वा हिशेब सापडतात. पण प्रत्यक्षात एकही फलम आणि चक्र नाणे अद्याप सापडलेले नाही. या नाण्यांचे एकमेकांशी कोष्टकात नेमके काय नाते होते तेही लक्षात येत नाही. राज्याभिषेक सोहाळ्यात प्रत्यक्ष वापरलेली सुवर्ण सिंहासनापासून गळ्यातील कवड्याच्या माळेपर्यंत प्रत्येक वस्तूला केव

147. 'मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली'

संत वाङ्मयातील ज्ञानेश्वरीचा वा श्रीतुकाराम महाराजांच्या गाथेचा सप्ताह चालावा किंवा शौर्यदर्शी खेळांचा महोत्सव साजरा होत राहावा किंवा एखादा यज्ञ चालावा तशाच प्रकारचा हा राज्याभिषेक सोहाळा रायगडावर चालू होता. आनंदाच्या डोही आनंदाचे तरंग उमटत होते. अजि सोनियाचा दिनु , वषेर् अमृताचा घनु या वचनांची साक्षात अनुभववृष्टी रायगड अनुभवित होता. यज्ञ करणारा यजमान राजा प्राचीन काळी ज्या पद्धतीने आठ-दहा दिवस व्रतस्थ राहत असे , तसेच महाराज या सप्ताहात अहोरात्र व्रतस्थ राहिले होते. खरं म्हणजे , त्यांचं सारं आयुष्यच व्रतस्थ होतं. राज्याभिषेकाचे विधी दोन प्रकारचे. प्रथम विधी अभिषेकाचा. त्यात पंचामृत आणि सर्व गंगोदके अन् समुदोदके यांनी अभिषेक हा अभिषेक म्हणजेच राज्याभिषेक. हा विधी राजवाड्यात आतील भागात , मोठ्या दालनात करण्यात येणार होता. या कार्यक्रमाला अष्टप्रधान , राजमंडळातील सरदार आणि राजकुटुंबाचे नातलग उपस्थित राहणार होते. सर्वसामान्य मंडळींना या कार्यक्रमात स्थान अपेक्षित नव्हते. पण अभिषेकानंतर राऱ्यारोहण म्हणजेच सिंहासनारोहण हा विधी तमाम उपस्थितांसाठी खुला राहणार

146.गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले!

राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या आप्तइष्ट मित्र , सेवक , अधिकारी , कलावंत , पंडित आणि पाहुणे यांची संख्या किती होती ? त्या काळाच्या मानाने ती प्रचंड होती. कुणी म्हटलंय , ८० हजार कुणी म्हटलंय ५० हजार गृहीत धरली तरी ती प्रचंडच आहे. आपल्या हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींना वंदन करण्यास एवढे लोक आले होते. आजही आम्हाला ऊर भरून आनंद होतो , की १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी दिल्लीत लाल किल्ल्याच्या समोर अवघ्या भारतातून सहस्त्र लोकगंगांचे प्रवाह खळाळत , धावत येतात. शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आणि आमच्या आजच्या स्वातंत्र्यसोहोळ्यांचे महत्त्व एकच आहे. आम्ही पूर्णपणे सार्वभौम स्वतंत्र आहोत या भावनेची आणि जाणीवेची किंमत किती मोठी आहे हे कोणत्या शब्दात सांगावं! अरे , इंदधनुष्याचा तराजू घ्या , तो कल्पवृक्षाच्या फांदीला टांगा , त्याला एक पारडे लावा इंदसभेचे अन् दुसरे पारडे लावा नंदनवनाचे. अन् मग त्यातल्या एका पारड्यात विश्वातील सर्व सुख आणि सर्व वैभव टाका. अन् दुसऱ्या पारड्यात स्वातंत्र्य टाका. ते स्वातंत्र्याचं पारडं इतकं ज

145.सुवर्णतुळा

दि. २९ मे १६७४ यादिवशी सकाळी महाराजांची मुंज करण्यात आली. म्हणजेच त्या महान विश्वामित्रप्रणित गायत्री मंत्राचा अधिकार संस्कारपूर्वक ' बटु ' स देण्यात आला. मुंजबटु ४४ वर्षांचा होता! महाराजांची यापूवीर्च आठ लग्ने झाली होती. त्यांना सहा मुली , दोन पुत्र आणि मुलींकडून काही नातवंडेही होती. इतका सगळा संसार झाला होता. फक्त मुंज राहिली होती. साडेतीनशे वर्षांपूवीर्पासून स्वातंत्र्य हरपल्यामुळे महाराष्ट्रातील क्षत्रिय घराण्यांचेही अनेक मोलाचे पवित्र धामिर्क संस्कार लुप्त झाले होते. वास्तविक महाराजांचे भोसले घराणे अशाच थोर राजघराण्यांपैकीच क्षत्रिय कुलावतांस होते. त्यांच्या घराण्याला ' राजा ' ही क्षत्रिय पदवी परंपरेनी चालूच होती. महाराजांचे पणजोबा बाबाजीराजे भोसले यांनाही कागदोपत्रीसुद्धा राजे हीच पदवी वापरली जात होती. भोसले नातेसंबंध फलटणच्या पवार कुलोत्पन्न नाईक निंबाळकर या ज्येष्ठ राजघराण्याशी आणि जाधवराव आदि उच्चकुलीन क्षत्रिय घराण्यांशीही होते. परंपरेने असे मानले जात होते की , हे भोसले घराणे चितोडच्या सिसोदिया घराण्याचीच एक शाखा महाराष्ट्रात आली , त्य

144. रायगड पाहुण्यांनी फुलू लागला

इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झिंडेन मुंबईहून रायगडास येण्यास निघाला. तो दि. १३ मे रोजी कोरलई जवळच्या आगरकोट या पोर्तुगीज ठाण्यात येऊन पोहोचला. त्याचेबरोबर आठ माणसे होती. त्यात एक श्यामजी नावाचा गुजराथी व्यापारी होता. राज्याभिषेकाचा मुहूर्त होता दि. ६ जून १६७४ . म्हणजे हेन्री खूपच लौकर निघाला होता का ? कारण त्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारीहिताची काही कामे शिवाजी महाराजांकडून मंजुरी मिळवून करावयाची होती. हेन्री आगरकोटला दि. १३ मे रोजी दिवस मावळताना पोहोचला , तेव्हा आगरकोटाला असलेले प्रवेशद्वार म्हणजे वेस बंद झालेली होती. रहदारी बंद! हेन्रीला मुद्दाम ही वेस उघडून आत घेण्यात आले. तेव्हा त्याने आगरकोटच्या पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नरला सहज विचारले , की ' अजून दिवस पूर्ण मावळला नाही. तरीही आपण वेशीचे दरवाजे बंद का करता ? त्यावर डे. गव्हर्नरने उत्तर दिले की , ' अहो , तशी काळजी आम्हाला घ्यावीच लागते. कारण तो शिवाजी केव्हा आमच्यावर झडप घालील अन् आगरकोटात शिरेल याचा नेम नाही. म्हणून आम्ही ही दक्षता घेतो. ' यातच शिवाजी महाराजांचा दरारा आणि दहशत केवढी होती

143.रायगड राजसाज सजला

रायगडावर राज्यभिषेकाची तयारी अत्यंत योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध रीतीने सुरू होती. गागाभट्ट हे महापंडित राज्यभिषेक विधीचे प्रमुख अध्वर्यू होते. पण राजघराण्याचे धामिर्क विधीसंस्कार करण्याचे काम भोसल्यांचे कुलोपाध्याय आणि राजोपाध्याय आवीर्कर यांचेच होते. सर्व विधी या बाळंभट्ट राजोपाध्याय यांनीच उपाध्याय या नात्याने केले. मार्गदर्शक होते , गागाभट्ट. गागाभट्टांनी या सर्व राजसंस्कारांची एक लिखित संहिता संस्कृतमध्ये गंथरूपाने तयार केली. या गंथाचे नाव ' राजाभिषेक प्रयोग. ' या ' राजाभिषेक प्रयोग ' या हस्तलिखित गंथाची एक प्रत बिकानेरच्या ( राजस्थान) अनुप संस्कृत गंथालयात पाहावयास मिळाली. हीच प्रत प्रत्यक्ष गागाभट्टांच्या हातची मूळ प्रत असावी , असा तर्क आहे. प्रत्येक विधी कसा आणि केव्हा करावयाचा याचा तो तपशीलवार आराखडा आहे. सुपारीपासून हत्तीपर्यंत आणि हळकुंडापासून होमकुंडापर्यंत , तसेच दर्भासनापासून सिंहासनापर्यंत सर्व गोष्टी दक्षतापूर्वक सिद्ध होत होत्या. ती ती कामे त्या त्या अधिकारी व्यक्तींवर सोपविण्यात आली होती. सोन्याचे बत्तीस मण वजनाचे सिंहासन तयार क

142.महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या निदान पहिल्या दोन पिढ्यांना उपभोगी , सुखवस्तू जीवन जगण्यास अवधीच मिळणार नाही. याच दृष्टीने शिवकालीन हिंदवी स्वराज्याची पहिली पन्नास वर्षे कशी गेली , याची बेरीज वजाबाकी योग्य तुलनेने आपण केली पाहिजे. आजच्या आपल्या स्वराज्याची गेल्या पन्नास वर्षांत सर्वच क्षेत्रात प्रगती निश्चित झाली आहे. पण गती मात्र कमी पडली , अन् पडत आहे हेही उघड आहे. याकरता इतिहासाचा अभ्यास आणि उपयोग केला पाहिजे. अशा अभ्यासासाठी शिवकाळात साधने फारच कमी होती. दळणवळण तर फारच अवघड होते. महाराजांची मानसिकता सूक्ष्मपणे लक्षात घेतली , तर असे वाटते की , युरोपीय प्रगत वैज्ञानिक देशांचा अभ्यास करण्यासाठी महाराजांनी आपली माणसे नक्की पाठविली असती. हा तर्क मी साधार करीत आहे. पाहा पटतो का! मराठी आरमार युरोपियनांच्या आरमारापेक्षाही सुसज्ज आणि बलाढ्य असावे असा त्यांचा सतत जागता प्रयत्न दिसून येतो. माझ्या तर्कातील हा एक महत्त्वाचा टप्पा. राज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली. हो , तयारी सुमारे वर्षभर आधी सुरू झाली. याच काळात पण प्रारंभी एक प्रकरण

141.तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय

माणसाला फुकट मिळालं की त्याची किंमत कळत नाही. त्याचा बाजारभाव समजतो , तसंच उपयोग आणि उपभोगही समजतो. पण महत्त्व आणि पावित्र्य समजत नाही. हिंदवी स्वराज्य असे नव्हतेच. कमालीच्या त्यागाने आणि अविश्रांत कष्टाने ते मिळविले गेले होते. मिळवणारी मावळी मंडळी अगदी साधी आणि सामान्य होती. पण त्यांचे मन हनुमंतासारखे होते. छाती फाडली , तर त्यात त्यांचा राजा , राज्य आणि ध्वजच दिसावा. एकेका घरातली एकेक माणसं इषेर्नं आणि हौसेनं कष्टत होती. मरत होती. अशीही असंख्य मावळी घरं होती की , त्या घरातील दोन-दोन किंवा तीन-तीन माणसं अशीच मरत होती. म्हणूनच एक अजिंक्य हिंदवी स्वराज्य एका राष्ट्रपुरुषाने उभे केले. अजिंक्य स्वराज्य ? होय , अजिंक्य. महाराजांच्या मृत्यूनंतर एक कर्दनकाळ , औरंगजेब आपल्या सर्व सार्मथ्यानिशी हे स्वराज्य गिळायला महाराष्ट्रात उतरला. अखंड पंचवीस वषेर् तो इथे यमदूतासारखा राबत होता. काय झाले त्याचे ? हे स्वराज्य बुडाले का ? नाही. औरंगजेबच बुडाला. मोगली साम्राज्यही बुडण्याच्या मार्गाला लागले. हे कोणामुळे ? कोणाच्या शिकवणुकीमुळे ? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्

140.स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी

काशीहून गागाभट्ट नासिकला आले. महाराजांनी त्यांना आणण्याकरिता पालखी पाठविली. दरबारातील चार थोर मंडळी सामोरी पाठविली. सन्मानपूर्वक त्यांना रायगडावर आणण्यात आले. महाराजांनी मधुपर्कपूर्वक या महापंडिताचे गडावर स्वागत केले. त्यांचा मुक्काम गडावर होता. प्रवासात आणि गडावर गागाभट्टांना स्वराज्याचे रूप स्पष्ट दिसत होते. महाराजांनी आपल्या असंख्य कर्तबगार , शूर , निष्ठावंत आणि त्यागी जीवलगांच्या सहकार्याने निर्माण केलेले एक सार्वभौम राष्ट्र जाणत्या मनाला स्पष्ट दिसत होते. या हिंदवी स्वराज्यात अनेक क्रांतीकारक घटना घडल्या होत्या , घडत होत्या. तेहरानपासून काबूलपर्यंत आणि खैबरपासून दिल्लीपर्यंत मराठी स्वराज्याचा दरारा सुलतानांना हादरे देत होता. दक्षिणेतील पातशाह्या निष्प्रभ झाल्या होत्या. इंग्रज , फिरंगी अन् सिद्दी आपले प्राण कसे वाचवायचे , याच चिंतेने ग्रस्त , पण दक्ष होते. अत्यंत शिस्तबद्ध अधिकारीवर्ग आणि राजकारणी मुत्सद्दी राज्यकर्तव्यात तत्पर होते. यादव , कदंब , शिलाहार , विजयनगर , वारंगळ , द्वारसमुद यांच्या उज्ज्वल परंपरेत आज रायगड आणि महाराज शिवाजीराजे निविर्वाद शोभ

139.सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी

चिंचवडच्या श्रीमोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणी महाराज आणि नातू नारायण महाराज देव या तीनही पिढ्यांतील गणेशभक्तीबद्दल भोसले राजघराण्यात नितांत आदरभाव होता. चिंतामणी महाराज आणि नारायण महाराज हे तर शिवाजीमहाराजांच्या अगदी समकालीन होते. श्रीमोरया गोसावी हे योगी होते. त्यांनी चिंचवडला संजीवन समाधी घेतली. या गणेशभक्तांबद्दल स्वराज्यस्थापनेपूवी र्च्या काही मराठी सरदार जहागीरदारांनी आपला भक्तिभाव चिंचवड देवस्थानाला जमिनी , पैसे , दागिने आणि काही इनामी हक्क प्रदान करून व्यक्त केला होता. येथे नेमकेच सांगायचे , तर श्रीनारायण महाराज देव यांना कुलाबा कोकणातील काही बाजारपेठेच्या गावातून पडत्या भावाने तांदूळ , नारळ , सुपारी , मीठ इत्यादी कोकणी माल खरेदी करण्याचा हक्क मिळालेला होता. म्हणजे समजा , देवमहाराजांना काही खंडी तांदूळ हवा असेल , तर तो बाजारभावापेक्षाही खूपच कमी भावाने परस्पर शेतकऱ्यांकडून वा व्यापारी दुकानदारांकडून खरेदी करण्याचा हक्क श्रीदेवांना मिळालेला होता. हा माल खरेदी करण्याकरता दरवर्षी श्रीदेवांचे कारकून आणि नोकर कोकणात जात असत. हा माल कोणा एकाच मालका

138. शिवरायांचे रूप कैसे असे?

शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मितहास्य तरळत असे , असे अनेक स्वकीय आणि परकीय भेटीकारांनी लिहून ठेवले आहे. आपल्याला आजही महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल कुतूहल असते. समर्थांनीही आवर्जून लिहिले आहे की , ' शिवरायाचे आठवावे रूप '. रूपानं महाराज कसे होते ? सावळे की गोरे ? काही युरोपीय भेटीकारांनीही महाराजांना गौरवर्णाचे म्हटले आहे. त्याअथीर् ते अगदी कोकणस्थी गोऱ्या रंगाचे नसले , तरी अधिक जवळ गव्हाळ रंगाचे असावेत. मुंबईच्या शिवछत्रपती म्युझियममध्ये ( पूवीर्चे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) महाराजांचे एक उभे रंगीत चित्र ( मिनिएचर) आहे. त्यात महाराजांचा रंग सावळा दाखविलेला आहे. हे चित्र चित्रकाराने इ.स. १७०० च्या जरा नंतरच्या काळात चितारलेले असावे , असे तज्ज्ञांचे मत आहे. चक्क काळ्या रंगात पं. जवाहरलाल नेहरू यांचीही चित्रे चित्रकारांनी काढलेली आहेत. पण नेहरूंचे गोरे देखणेपण आपण प्रत्यक्ष पाहिलेले आहे. चित्रकाराने काळ्या वा वेगळ्या रंगात चित्र काढले , ही त्या चित्रकाराची शैली आहे. तसेच महाराजांचे मुंबईचे हे चित्र आहे. हे चित्र मूळ साताऱ्याच्

137.आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर!

साल्हेर! आपल्या इतिहासात विशेषत: इ. १२९६ पासून पुढे रक्तपाताने लाल झालेली पानेच जास्त दिसतात. पण शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा प्रारंभ करून उघडउघड युद्धकांडच सुरू केले नाही का ? पण या स्वातंत्र्ययुद्धकांडाचा इतिहास वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते , की महाराजांनी करावे लागले तिथे युद्ध केलेच , पण शक्यतेवढा रक्तपात टाळण्याचाही प्रयत्न केला. या शिवस्वराज्य पर्वाला सुरुवात झाली. इ. १६४६ मध्ये. पण तोरणा , कोरीगड , पुरंदर हे किल्ले रक्ताचा थेंबही न सांडता त्यांनी स्वराज्यात आणले. इतकेच काय , पण सिंहगडसारखा किल्ला सिद्दी अंबर वाहब या आदिलशाही किल्लेदाराच्या हातून ' कारस्थाने करोन ' महाराजांच्या बापूजी मुदगल नऱ्हेकर याने स्वराज्यात आणला. प्रत्यक्ष पहिली लढाई महाराजांना करावी लागली , ती दि. ८ ऑगस्ट १६४८ या दिवशी आणि या आठवड्यात. विजापूरचा सरदार फत्तेखान शिरवळ आणि पुरंदर या किल्ल्यांवर चालून आला. त्यावेळी महाराजांनी त्याच्या खळद बेलसरवर असलेल्या (ता. पुरंदर) छावणीवर पहिला अचानक छापा घातला. लढाई झाली. पण या गनिमी काव्याच्या छाप्यात रक्तपात किं

136.मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व

शिवाजी महाराज हे स्वराज्य संस्थापक होते. पण तेही या स्वराज्याचे प्रजाजनच होते. राजेपण , नेतेपण आणि मार्गदर्शक गुरूपण या महाराजांच्या वाट्याला आलेल्या भूमिका होत्या. त्या त्यांनी आदर्शपणे पार पाडल्या. सत्ताधीश असूनही जाणत्यांच्या आणि कर्तबगारांच्या पुढे ते सविनय होते. अहंकार आणि उद्धटपणा त्यांना कधीही शिवला नाही. मधमाश्यांप्रमाणे शंभर प्रकारची माणसं त्यांच्याभोवती मोहोळासारखी जमा झाली. त्यांचा त्यांनी त्यांच्या योग्यतेप्रमाणे उपयोग केला. या साऱ्यांना सांभाळण्याचं काम सोपं होतं का ? जिजाऊसाहेब ते काम जाणीवपूर्वक ममतेने आणि मनापासून कळवळ्याने करीत होत्या. माणसांशी वागणं ही त्यांची ' पॉलिसी ' नव्हती. प्रेम हा त्यांचा स्थायीभाव होता. सध्याच्या काळात लोकप्रतिनिधित्त्व करणाऱ्या संसदेपासून ग्रामपंचायतीपर्यंतच्या कार्यर्कत्यांनी जिजाऊसाहेबांच्या नेतृत्वाचा म्हणजेच मातृत्त्वाचाच अभ्यास करावा. त्या उत्कृष्ट संघटक होत्या. शाही धुमाकुळात उद्ध्वस्त झालेल्या पुणे शहरात त्या प्रथम राहावयास आल्यावर ( इ. १६३७ पासून पुढे) त्यांनी पुण्याभोवतीच्या