Skip to main content

Posts

135.राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान

स्वराज्याचे एक विलक्षण मोलाचे सूत्र महाराजांनी आणि जिजाऊसाहेबांनी अगदी प्रारंभापासून , कटाक्षाने सांभाळले होते. ते म्हणजे , स्वराज्यात लायकीप्रमाणे काम मिळेल. लायकीप्रमाणे दाम मिळेल. लायकीप्रमाणे स्थान मिळेल. हेच सूत्र फ्रान्सच्या नेपोलियनला पूर्णपणे सांभाळता आले नाही. जिंकलेल्या नवनवीन प्रदेशावर नेमायला नेपोलियनला नातलग , सगेसोयरे अपुरे पडले. त्यामुळे गुणवत्ता ढासळली. अखेर सम्राट झालेला नेपोलियन ब्रिटीशांचा कैदी म्हणूनच तुरुंगात मरण पावला. पण योग्य लायकी असलेल्या नातलगालाही टाळायचे का ? तसेही महाराजांनी केले नाही. त्यांचे थोडेेसेच पण फार मोठ्या योग्यतेचे नातलग अधिकारपदावर होते. अभ्यासकांचे विशेष लक्ष वेधते ते काही व्यक्तींवर. उदाहरणार्थ बहिजीर् नाईक. हा बहिजीर् रामोशी समाजातील होता. पण योग्यतेने राजकुमारच ठरावा , असा महाराजांच्या काळजाचा तुकडा होता. तो अत्यंत धाडसी , अत्यंत बुद्धिमान , अत्यंत विश्वासू , तिखट कानाचा आणि शत्रूच्या काळजातलही गुपित शोधून काढणाऱ्या भेदक डोळ्याचा , बहिरी ससाणा होता. महाराजांनी त्याला नजरबाज खात्याचा सुभेदार नेमले होते. सुभेदार म...

134.महाराजांची विश्वासू संपत्ती

हिंदवी स्वराज्याची सुरुवात शून्यातून झाली. अगदी गरीब अशा मावळी शेतकऱ्यांच्या , गावकामगारांच्या आणि कोणतीतरी मजुरी करणाऱ्या ' बिगाऱ्यां ' च्या संघटनेतूनच महाराजांनी आणि विलक्षण संघटन कौशल्य असलेल्या जिजाऊसाहेबांनी हा धाडसी डाव मांडला. माणसं म्हटली की , स्वभावाचे आणि गुणदोषांचे असंख्य प्रकार आलेच. या सर्वांना एका ओळंब्यात आणून , धाडसी आणि अति अवघड विश्वासाची कामे करवून घेणे , म्हणजे आवळ्याभोपळ्याची एकत्र मोट बांधण्याइतकेच अवघड काम होते. त्यात पुन्हा स्वाथीर् आणि गुन्हेगार प्रकृतीची माणसे थोडीफार तरी असणारच. आंबेमोहोर तांदळात खडे निघतातच की , ते शिजत नाहीत. आधीच वेचून काढावे लागतात. माणसांचेही तसेच. म्हणूनच या मायलेकरांनी या सर्व माणसांची निवडपाखड करून , जिवावरची कामंसुद्धा करवून घेण्यासाठी केवढं कौशल्य दाखवलं असेल ? पण त्यात ही मायलेकरे यशस्वी ठरली. ती इतकी , की स्वराज्याची सर्वात मोठी धनदौलत म्हणजे ही माणसेच होती. ती सामान्य होती. पण त्यांनी असामान्य इतिहास घडविला. महाराजांची ही माणसं म्हणजे स्वराज्याची हुकमी शक्ती. एकवेळ बंदुकीची गोळी उडायला उ...

133 शिवस्पर्श

महाराजांची चित्रकारांनी हातांनी काढलेली चित्रे काही उपलब्ध आहेत. त्यातील काही अगदी समकालीन आहेत. काही इ. १६८० नंतर पण नक्कीच पण नजिकच्याच काळात कॉपी केलेली असावीत. पण समकालीन चित्रे उपलब्ध आहेत आणि त्यावरून महाराजांचे रूप आपण पाहू शकतो , हाच आपला आनंद मोठा आहे. आता चित्रकार ज्या योग्यतेचा असेल , त्या त्याच्या योग्यतेप्रमाणेच चित्र तयार होणार. त्याची तुलना किंवा अपेक्षा आपण आजच्या कॅमेऱ्याशी करू शकत नाही. येथे मुद्दा असा , की महाराजांच्या अंगावर मस्तकापासून पावलांपर्यंत जी वस्त्रे दाखविलेली आहेत , ( याला सिरपाव म्हणतात) त्याचा आपल्याला थोडाफार परिचय होऊ शकतो. पहिली व्यथा ही सांगितली पाहिजे की , या त्यांच्या वस्त्रांपैकी एकही वस्त्र विशेष आज उपलब्ध नाही. त्यांच्या मस्तकावरील पगडी किंवा पागोटे किंवा जिरेटोप जो चित्रात दिसतो , तो उत्तरेकडील आणि दक्षिणेकडीलही सुलतानी अंमलात दरबारी व्यक्ती जशा तऱ्हेचा वापरत असत , तसाच आहे. आज दिल्ली , राजपूत , कांगडा , लखनौ , गोवळकोंडा , तंजावर , विजापूर इत्यादी चित्रकलेच्या शैलीतील (स्कूल) अगणित चित्रे (मिनिएचर्स आणि म्युरल्स) उपलब...

132.महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे

शिवाजी महाराज ' हे दोन शब्द तुमच्या आमच्या मनाचे आणि तनाचे अविभाज्य घटक आहेत. अगदी जन्मापासून मरणापर्यंत या आपल्या राजाची साक्षात आठवण म्हणून त्याच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या अशा , त्याच्या स्वत:च्या वस्तू , वस्त्रे , शस्त्रे , चित्रे , हस्ताक्षरे , पत्रे आणखी काही आज आपल्याला उपलब्ध आहे का ? असेल तर ते कोठेकोठे आहे ? ते सर्वसामान्य नागरिकाला विशेषत: तुमच्या आमच्या मुलांना पाहावयास मिळेल का ? निदान त्याची प्रकाशचित्रे तरी मिळतील का ? महाराजांची विश्वसनीय अस्सल नाणी कोणती ? त्यातील समकालीन अस्सल कोणती ? उत्तरकालीन पेशवाईतील शिवनाणी कशी ओळखायची ? इत्यादी कितीतरी कुतुहली प्रश्न आपल्याला पडतात. त्या सर्वांचीच उत्तरे चोख देता येत नाहीत. कारण त्याचे पुरावे उपलब्ध नसतात. पण जे काही आहे , ते समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा सगळ्या वस्तू वास्तूंना ' शिवस्पर्श ' असे नाव देता येईल. असे शिवस्पर्श आज किती उपलब्ध आहेत ? महाराजांनी स्वत: जे काही हाताळले अन् वापरले असे आज नक्की काय काय आहे ? पहिली वस्तू म्हणजे त्यांची भवानी ...

131..सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही

इतिहासाचा , विशेषत: शिवकालाचा अभ्यास करताना मराठी योद्ध्यांची चकित करणारी बहाद्दुरी प्रथम डोळ्यापुढे येते. मुत्सद्दी बुद्धिवंतांची ऊटपटांग चातुर्यवती प्रतिभा आपल्याला चक्रावून टाकते. विद्वानांची बुद्धिवंत लेखनशैली आपल्याला हलवून जागे करते. शाहिरांची ललकारी आपल्याला शहारून टाकते. पण किल्ल्यांची बांधकामे , अतिअवघड ठिकाणी केलेली मोठ्या दरवाजांची वा सांदिसापटीत बेमालूम केलेली चोरवाटांची रचना पाहून तुमच्याआमच्या मनातले आश्चर्यही थक्क होते. टनावारी वजनांचे दगडी चिरे या कामगारांनी घडविले तरी कसे अन् पाचपाच पुरुष उंचीवर नेऊन ओळंब्यात जडविले तरी कसे हे समजत नाही. मणावारी वजनांच्या मोठमोठ्या तुळ्या आणि फळ्या अखंड मापात दारा झरोक्यांना या सुतारांनी कशा फिट्ट बसविल्या असतील ? अशा अवजड कामात स्वराज्यातले कामगार मजूर , बेलदार , पाथरवट , गवंडी सुतार , लोहार इत्यादी मंडळी अतिशय कष्टाळू , काटक आणि तरबेज होती. तेवढीच ती अंतर्मनातून कल्पक , अभिमानी आणि निष्ठावंत होती. हे किल्ल्यांवरील अवघड काम करीत असतांना अनेकदा अपघातही होत आणि या कामगारांना प्राणाची किंमत मोजावी लागे. अनेकजण जायबंदीही ह...

130. अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे

महाराष्ट्राला विशाल सागरी किनारा लाभला आहे. निसर्गानेच अशी रचना केली आहे की , महाराष्ट्राच्या पश्चिमेला हा समुद आणि किनाऱ्यावरची जंगलमय कोकणपट्टी दक्षिणोत्तर पसरलेली आहे. पूवेर्स घाटावरचा देश , मधून बलदंड आणि नदीनाल्यांनी सजलेला सहस्त्रशीर्ष सह्यादी असे हे महाराष्ट्राचे रूप आहे. त्यात कोकणपट्टा समुदाच्या सान्निध्यामुळे अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तेवढाच तो सांभाळावयास जोखमीचाही ठरतो. कारण या पश्चिम समुदाच्या बाजूने सारे पश्चिमी जग कोकणावर हल्ले करावयास सतत टपलेले असावयाचे. युरोपीय अठरा टोपीवाले , क्रूर सत्ताकांक्षी अरब आणि दैत्यवृत्तीचे औबिसिनियन काळे हबशी यांची ग्रहणे कोकणपट्टीला सततच ग्रासत असत. चाचेगिरी करणाऱ्यांची क्रूर धाड जवळजवळ रोजच कुठे ना कुठे पडतच असायची. पोर्तुगीज आणि सिद्दी यांनी कोकणच्या काही भागात आपली सत्ताच कायमची मांडली होती. त्यांच्या जोडीला आता (इ. स. १६६४ पासून पुढे) इंग्रज मुंबईत कायमचे सत्ताधारी होऊन बसले होते. शिवाजीमहाराजांनी या संपूर्ण कोकण कुंडलीचा सुरतेपासून कारवारपर्यंतचा पुरेपूर अभ्यास (सव्हेर्) केलेला दिसून येतो. आपल्या हिंदवी स्वराज्याच...

129.आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते

दिल्लीत औरंगजेब वैतागला होता ' शिवाजी ' नावाच्या दुखण्याला. इ. स. १६६० पासून त्याने महाराष्ट्रावर सतत स्वाऱ्या चालू ठेवल्या. मोगल , राजपूत , पठाण , अरब , रझाकी , इराणी अन् असेच अनेक लढवय्ये सेनापती आणि सैनिक तो स्वराज्यावर पाठवीत होता. युद्धसाहित्य आणि पैसा अपरंपार ओतीत होता. मनुष्यबळाला तोटा नव्हता , तरीही कोणालाही शिवाजी महाराजांच्या विरुद्ध यश मिळत नव्हते. मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान पठाण यांचा अपवाद सोडला तर बाकी सगळे सेनानी नापास होत होते. एक गोष्ट लक्षात येते की , औरंगजेब स्वत: महाराजांविरुद्ध स्वराज्यावर कधीही चालून आला नाही. त्याच्या मनात सतत एक धास्ती होती की , माझाच पराभव झाला , तर काय होईल. म्हणून तो धोका पत्करत नव्हता. महाराज आग्ऱ्यात आणि आपल्या जबड्यात गवसले असतानाही पसार झाले. याचा त्याला अतिशय पश्चाताप होत होता. पश्चाताप ? होय पश्चाताप , तो त्याने आपल्या स्वत:च्या तोंडाने पुढे अनेकदा बोलून दाखवला आहे. त्याच्या नोंदी त्याच्या स्वत:च्या डायरीत आहेत. तो सतत पुढे बोलून दाखवीत असे की , ' मी माझ्या आयुष्यात सर्वात मोठी भयंकर चूक केली....