Skip to main content

शिवरायांचा आठवावा साक्षेप

शिवराय हे धर्मनिरपेक्षतेचे नायकच नव्हे , तर महानायक होते. आज ते सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक बनायला हवे होते.पण , त्यांच्या राजवटीला धामिर्क परिमाण देऊन त्यांना ' मुस्लिमविरोधी हिंदूधर्मरक्षक ' बनवले जात आहे.आज देश कधी नव्हे एवढ्या धर्मचक्रव्यूहात सापडला आहे. धर्माच्या नावाने मत्सरभावना वाढीस लावल्या जात आहे. राजकीय सत्तेसाठी धूर्त मंडळी धर्माचा वापर करून दंगली करताहेत. आणि हे करताना ' शिवाजी महाराज की जय ' म्हणून घरांना आगी लावतात हे फारच क्लेशकारक आहे. शिवरायांला कट्टर धर्मश्ाद्ध ठरवून , त्यांच्या विचाराची मोडतोड करून समाजात विष पेरण्यात धूर्त मंडळी यशस्वी होत आहेत. शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्षतेचे नायकच नव्हे , तर महानायक होते. त्यांच्या राजवटीला धामिर्क परिमाण दिले जात आहे. ते मुस्लिमविरोधी व हिंदूधर्मरक्षक होते , असे सांगण्यात येत आहे.

पण , शिवराय कधीही मुस्लिमविरोधी नव्हते. त्यांच्या पदरी , तेही मोठमोठ्या हुद्द्यांवर अनेक मुसलमान सरदार , वतनदार होते. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान होता , आरमाराचा प्रमुख दर्यासारंग दौलत खान होता , अंगरक्षक मुसलमान होता , तर अफझलखानाचा अंगरक्षक व वकील कृष्णाजी भास्कर कुलकणीर् होता. याचा भावार्थ असा की , त्यावेळी समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी नव्हती. जे शिवरायांचे मुस्लिम सैन्य होते ते मोगलांविरुद्ध लढे , तर मुसलमान राज्याच्या पदरी असलेले हिंदू सैनिक शिवरायांविरुद्ध लढत.

इतिहासकार काफी खान म्हणतात की , शिवराय आपल्या सैनिकांना मशीद , कुराण व बायबल यांचा कधीही अपमान करू देत नसे. स्वारीवर असताना बायबल किंवा कुराण आढळले तर ते मोठ्या आदरपूर्वक जवळ घेत व सैन्यात मुस्लिम व ख्रिश्चनांना नोकरी देत असत. फ्रेंच प्रवासी बनीर्यर याने म्हटले आहे की , शिवरायांनी कांपुचियन मिशनरी फादर अब्रोस याच्या घराचे व इतर वस्तूंचे मोठ्या आदराने रक्षण केले. शिवाजी महाराजांनी म्हटले होते की , फेंच पादरी ही चांगली माणसे असतात , त्यांना उपसर्ग होता कामा नये. परंतु , आज त्यांच्या नावाचा उद्घोष करणारे ख्रिश्चन मिशनऱ्यांवर हल्ले करतात , नन्सवर बलात्कार करतात. महाराजांच्या गुरूंपैकी संत याकूब बाबा हे मुस्लिम संतही होते. हे पाहता , खरेतर आज शिवराय सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक बनायला हवे होते. पण , त्यांना हिंदुत्ववाद्याच्या हातातील मुस्लिमविरोधी अमोघ हत्याराची अवकळा आणली जात आहे. मुस्लिम धर्माविरुद्ध आपली मते प्रस्थापित करण्यासाठी जे महाराजांच्या नावाचा वापर करतात , त्यांना सामान्य लोकांनी सुनावले पाहिजे की , शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेत राजा म्हणून कधीही धर्मावरून भेद केला नाही. आपल्या धर्माइतकाच दुसऱ्याचा धर्मही श्ाेष्ठ व उच्च आहे असे त्यांचे मत होते.

शिवराय इतर मराठा सरदारांप्रमाणे मोगल सेनेचे मांडलिक बनले नाहीत. ते परकीय सत्तेच्या विरोधात संघर्षरत राहिले. वारसा हक्काने ते राजा बनले नव्हते , तर बुद्धीच्या व तलवारीच्या जोरावर राज्य स्थापन केले होते. ते शूर लढवय्ये व कुशल संघटक होते.

पण आज शिवरायांबद्दल काही संघटना खोटा इतिहास लोकांना सांगत आहेत. शिवरायांच्या प्रखर बुद्धीला व पराक्रमाला ते नाकारत आहेत. दांभिक माणसे शिवाजीच्या यशाचे श्ाेय अध्यात्म व भवानीदेवीला देत आहेत. शिवाजी महाराजांना भवानी प्रसन्न झाली , म्हणून ते यशस्वी झाले , असे भोळ्याभाबड्या लोकांना सांगण्यात येत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की , भवानी तलवार म्हणून जिचा गाजावाजा करतात ती तलवार पोर्तुगीज बनावटीची होती.

सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याच्या महाराजांच्या प्रयत्नांना ब्राह्माण कारकुनांचा विरोध असे. राज्याभिषेका-नंतर शिवरायांनी सामाजिक सुधारणांना गती दिली होती , पण , त्यांनाही ब्राह्माणांकडून विरोध झाला. तेव्हा महाराजांनी ' ब्राह्माण म्हणोनी कोणाचा मुलहीजा करणार नाही ' अशी सक्त ताकीद दिली होती.

हिंदूधर्मरक्षक म्हणून शिवाजीला मिरवणाऱ्या मतलबी लोकांनी विसरू नये की , याच हिंदू धर्माने व त्याच्या रक्षकांनी शिवाजीच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. 44 व्या वषीर् मुंज व एकदा झालेला विवाह दुसऱ्यांदा करावयास लावला होता. महाराजांना वठणीवर आणण्यासाठी औरंगजेबाने जयसिंगास महाराष्ट्रात पाठविले होते. शिवाजीवर विजय कसा मिळवावा या चिंतेत तो असताना इथल्या ब्राह्माणांनी त्यासाठी देवीप्रयोगी अनुष्ठाने व कोटचंडी यज्ञ करण्याचा सल्ला दिला होता. एकीकडे शिवराय मोगल साम्राज्यशाहीची मृत्युघंटा वाजवीत होते , तर दुसरीकडे महाराष्ट्रातील भिक्षुकशाही मात्र धामिर्क प्रतिक्रांतीद्वारे मोगल साम्राज्यशाहीचे मरण लांबणीवर टाकत होती.

शिवरायांच्या संघर्षकाळात त्यांचे सर्व सैनिक मावळे होते. त्यांत आदिवासी , कुणबी , अस्पृश्य व मुस्लिम होते. या सर्व मावळ्यांना शिवाजीने ' मराठा ' बनविले , असे ग्रँट डफ यांच्या ग्रंथात नमूद केले आहे. शिवरायांनी स्त्रियांचा मान राखला होता. शिवाजीच्या काळी गोरगरीबांच्या लेकी-सुना या पाटील-वतनदाराच्या उपभोगवस्तू होत्या. पण शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन फार वेगळा होता. 1678 साली सकुजी गायकवाड या सेनापतीने सावित्रीबाई देसाई या किल्लेदार बाईस हरवून विजयाच्या उन्मादात तिच्यावर बलात्कार केला. हे शिवरायांना समजले , तेव्ह त्यांनी सकुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावून जन्मभर तुरुंगात टाकले.

एकदा राज्याच्या पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या मुलीला सर्वांसमक्ष उचलून नेली व उपभोगली , तेव्हा शरमेने तिने जीव दिला. महाराजांनी पाटलाला मुसक्या लावून पुण्यात आणले गेले व त्याचे हातपाय तोडले. रयतेच्या अब्रूचे रक्षण करणाऱ्या शिवाजीचा आदर्श त्याचे उठसूठ नाव घेणारे पाळतात काय ? अत्याचाऱ्यास शिक्षा होते काय ?

तथाकथित शिवभक्त व कट्टर हिंदुत्ववादी शिवाजीचा हा आदर्श पाळून त्यांच्या डोक्यावर मानाचा तुरा लावतील काय ?

Comments

Popular posts from this blog

Introduction:-

Shivaji Shahaji Bhosle (Born:February 19, 1630, Died: April 3, 1680), commonly known as Chhatrapati Shivaji Maharaj (Marathi: छत्रपती शिवाजीराजे भोसले) was the founder of the Maratha Empire. Shivaji was younger of the two sons of Shahaji Bhosle and Jijabai. His father, Shahaji was a Maratha general who served at various occasions the Bijapur Sultanate, Deccan sultanates and the Mughals. Shivaji with his ideology of Hindavi Swaraj (freedom for Hindustan) decided to directly challenge Bijapur Sultanate rule and eventually the Mughal empire, to establish the Marāṭhā Sāmrājya or the Maratha Empire. Shivaji succeeded in establishing control of major portion of western India during his lifetime. . At its peak the Maratha Empire rule spread across most of the present day India. Shivaji’s ideology of Hindavi Swaraj and subsequent expansion of the Maratha Empire, was partly responsible for re-establisment of Hindu rule and its re-emergent assertiveness throughout the mainland of present day

आठवावा प्रताप !

शिवाजी महाराजांच्या मुंबईच्या समुद्रातील स्मारकावर महाराष्ट्रात बरंच वादळ घोंगावतयं. पण या स्मारकावरुन होणारा गोंधळ काही नवीन नाही. आणिकही धर्मकृत्ये चालती। आश्रित होउनि कितेक असती। धन्य धन्य तुमची कीर्ति। विश्वी विस्तारली।। समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सतराव्या शतकात केलेले हे वर्णन. काळाच्या ओघात संदर्भ बदलल्याने अनेक वर्णने अर्थहीन बनतात. परंतु ' आश्रित होउनि कितेक असती ' हे वर्णन मात्र चारशे वर्षांनंतरही कित्येकांस लागू पडते. अशा मानसिकदृष्ट्या आश्रित असलेल्या आमदारांनी गुरुवारी विधान परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक करण्याच्या प्रश्ानवरून गदारोळ घातला व अखेर कमजोर सरकारकडून आश्वासनही मिळवले. शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षांनी आपापली दुकाने चालवण्यासाठी जितका केला , तितका अन्य कुणा राष्ट्रपुरुषाचा केला गेला नसेल. शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक करण्यासाठी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारच्या काळात एक समिती नेमण्यात आली. या समितीने 1999 मध्ये अहवाल सादर केला खरा , पण दरम्यान युतीची सत